मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते?
मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते ? सध्या आपण संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीशी लढतो आहे. याच बरोबर आपल्याला आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत जसे की अन्न, वस्त्र, निवारा यादेखील या कठीण परिस्थितीमध्ये सहजरित्या मिळणे अवघड होऊन बसले आहे. याच मूलभूत गरजा पुढे उत्तम आरोग्य आणि उत्तम शिक्षण असे वाढलेले दिसते. मी सामान्य घरातील नागरिकांच्या विषयीच बोलतो आहे फक्त. याच सामान्य लोकांच्या नोकऱ्या देखील सध्या शाबूत नाहीत. किंवा भविष्यात त्या शाबूत राहतील याची देखील कोणतीही हमी नाही. या परिस्थितीमध्ये निदान घरातील आर्थिक भार व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रात लॉकडाऊन टप्या टप्याने खोलण्यात आले. काही कामकरी वर्गाला प्रथम प्राध्यान्य देऊन आज बहुतांशी कामगार वर्ग रोज घराच्या बाहेर पडत आहे. हा बाहेर कामाला पडणारा कामगार वर्ग आज बाहेर सुरक्षित आहे का? अजिबात नाही; तरीही तो कामासाठी घरातल्या दोन वेळच्या जेवणाची सोय करता यावी म्हणून तो घराच्या बाहेर पडतोय. काही वर्गाला घरीच बसुन राहावे लागत आहे, घरी लहान मुले अडकुन राहिली आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचे आहे, कोरोना...